शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

भारताच्या सत्यार्थींना नोबेल

By admin | Published: October 11, 2014 6:24 AM

या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे.

ओस्लो : गेल्या तीन दशकांहून जास्त काळ बालहक्क संरक्षणासाठी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झटणारे गांधीवादाचे पाईक कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानातील तालिबानी हल्ल्यातून बचावल्यानंतर बालहक्क आणि मुलींच्या शिक्षणाला वाहून घेणारी मलाला युसूफझई यांना शांततेसाठीचा २०१४चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या वाट्याला एकाचवेळी हा सन्मान आला आहे. साठीच्या घरातील सत्यार्थी हे सर्वार्थाने भारतीय असलेले शांततेच्या नोबेलचे पहिले मानकरी, तर १७ वर्षांची मलाला या पुरस्काराची सर्वात लहान मानकरी ठरली आहे. या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे. भारतीय उपखंडात या दोघांनी बालहक्क व मुलांचे शिक्षण यासाठी केलेल्या कार्याबद्दल ही निवड झाली. सत्यार्थी यांनी भारतात मुलांची बालमजुरी व तस्करी यातून सुटका करण्यासाठी एनजीओ स्थापन केली व त्यासाठी विद्युत अभियंत्याची नोकरीही सोडून दिली. तर मलाला तालिबानने दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावली. मुलींच्या शिक्षणसाठी काम करण्याचा तिचा निर्धार आजही कायम आहे. सत्यार्थी यांच्या एनजीओने ८० हजार मुलांची बालमजुरीतून मुक्तता केली आहे. मुले व युवक यांची अत्याचारातून मुक्तता करण्यास तसेच मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अखंड परिश्रम करणारे सत्यार्थी व मलाला यांची निवड २०१४च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला आहे, असे ज्युरींनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यार्थी व मलाला यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.