शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Coronavirus: मोठी बातमी! 'Omicron' ला हलक्यात घेणं पडेल भारी; कोरोनाबाबत WHO चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 1:38 PM

WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दक्षिण कोरियात तर एकाच दिवसाला ४ लाख रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. कोरोना महामारीवर(Coronavirus) नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं वाटत असतानाच पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) तंत्रज्ञान प्रमुख मारिया वैन कारखेव(Maria Van Kerkhove) यांनी कोरोनाशी निगडीत ३ चुकीचे फॅक्ट्स सांगितले आहेत.

एका पत्रकार परिषदेत मारिया वैन कारखेव म्हणाल्या की, आमच्याकडे कोरोना महामारीबद्दल चुकीच्या अफवा पसरल्याची माहिती आली आहे. ३ चुकीच्या अफवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. यातील पहिलं म्हणजे कोविड १९ महामारी संपुष्टात आली आहे. दुसरी ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट काही गंभीर नाही आणि तिसरं म्हणजे कोरोनाचा हा शेवटचा व्हेरिएंट होता असं कारखेव यांनी सांगितले.

WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना रुग्णसंख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. BA.2 आतापर्यंतचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं आढळलं आहे. लोकसंख्येच्या स्तरावर BA.1 पेक्षा BA.2 मध्ये गंभीरता कमी आहे. अधिकांश हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल. तेच वाढलेल्या मृत्यूचं कारण बनेल असं कारखेव यांनी म्हटलं आहे.

चिंता वाढली, पण भारताला थोडा दिलासा

ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र, भारतातील या सब व्हेरिएंट संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ज्ञ फारसे चिंतित नाहीत. याचे सर्वात मोठे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाढलेली प्रतिकारशक्ती असल्याचे सांगितले जात आहे.भारतात गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरस ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. या व्हेरिएंटमध्ये ५० हून अधिक म्यूटेशन होते. दरम्यान, सुरुवातीला हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याने भीती निर्माण झाली, परंतु नंतर गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने लोकांमधील भितीच वातावरण संपलेले आहे. परंतु तेच पाहता WHO नं लोकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना