शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

15 ऑगस्टला PM मोदी बांगलादेशातील हिंदूंसंदर्भात बोलले, 17 ऑगस्टला झाला मोठा 'खेला'; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 10:53 AM

... हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. हे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ आठ दिवसांतच एक मोठा फेरबदल करण्यात आआला आहे. 

बागलादेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदाचा राजीनामा देऊन भारतात आल्यानंतर, तेथे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. मात्र, हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. हे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ आठ दिवसांतच एक मोठा फेरबदल करण्यात आआला आहे. 

गृह मंत्रालयाच्या सल्लागाराला रातोरात हटवलं -बांगलादेशातील डेली स्टार वत्त पत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ब्रिगेडियर जनरल (सेवानिवृत्त) एम सखावत हुसैन यांना देशातील अंतरिम सरकारमधील गृह मंत्रालयाच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांना शुक्रवारी रात्रीच नियुक्त करण्यात आले आहे. जहांगीर यांच्यासह चार नवीन सल्लागारांनी पदाची शपथ घेतली. सरकारी वृत्तसंस्था 'बांग्लादेश संगाबाद संस्थे'ने (BSS) दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने चार मंत्रालये आणि राष्ट्रपती कार्यालयात करारावर पाच सचिवांची नियुक्ती केली आहे.

...या कारणामुळं गेली खुर्ची -ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत यांना, त्यांच्याच वक्तव्यावर बोट ठेवत गृह सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.  यानंतर, बीएनपी आणि त्यांच्या तीन सहकारी संघटनांनी त्यांचा राजीनामा मागितला होता.

'...मला काही फरक पडत नाही' - सखावत यांनी 11 ऑगस्टला सर्व राजकीय पक्षांना इशारा देत म्हटले होते, जर आता आपल्याला वाटत असेल की, आपण बाजारांवर नियंत्रण मिळवू शकाल आणि जबरदस्तीने वसुली करू शकाल, तर आपण पुढे येऊ शकता आणि काही काळापर्यंत असे करू शकता. मात्र, मी सैन्याच्या प्रमुखांना आपल्या तंगडी तोडण्याची विनंती केली आहे. मला काही फरक पडत नाही. तुम्ही 'भाड'मध्ये जा. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

मुख्य सल्लागार युनुस यांच्या प्रेस विंगनुसार, अंतरिम सरकारने आठ सल्लागारांच्या विभागाचे पुन्हा नव्याने वाटप केले आहे. यात, सखावत यांना कपडे आणि जूट मंत्रालय, तर जहांगीर आलम यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.

15 ऑगस्टला काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -78व्या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात राहत असलेल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. "बांगलादेशात जे काही घडले, त्यासंदर्भात एक शेजारील देश म्हणून चिंता वाटते. तेथील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल अशी आशा करतो. विशेषतः तेथील अल्पसंख्याकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, अशी 140 कोटी देशवासियांची इच्छा आहे.

17 ऑगस्टला बांगलादेशच्या पंतप्रधानांचा  पीएम मोदींना फोन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यात शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. या संभाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी X वर लिहिले, "मला मोहम्मद युनूस यांचा फोन आला होता. आम्ही बांगलादेशच्या सद्यस्थितीसंदर्भात चर्चा केली. मी लोकशाही, स्थैर्य, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशसाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला. त्यांनीही (मोहम्मद युनूस) बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे."

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदू