शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:04 IST

पाकिस्तानचे स्थायी राजदूत मुनीर अक्रम यांनी नवा भारत धोकादायक आहे म्हणत ते टार्गेट किलिंग करत असल्याचे म्हटलं आहे.

Pakistan Ambassador : लोकसभा निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजप नेत्यांकडून पाकिस्तानातील परिस्थितीची उदाहरणं दिली जात आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभांमध्ये घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांना ठार मारतो, अशी विधाने केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी टार्गेट किलिंगवरून भारतावर निशाणा साधला आहे. नवीन भारत इतरांच्या घरात घुसून तुम्हाला मारत आहे, असे मुनीर अक्रम यांनी म्हटलं. तसेच पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असेही अक्रम म्हणालेत.

पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांवरून अक्रम यांनी भारताला लक्ष्य केले. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना अक्रम यांनी अमेरिकन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला दिला आणि भारतावर निशाणा साधला. कॅनडातील खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडवून आणल्या आहेत, असे अक्रम यांनी म्हटलं.

"पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, सरचिटणीस आणि महासभेच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगच्या घटनांविरोधात भारताच्या मोहिमेची माहिती दिली आहे. मात्र, हे केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. यामध्ये कॅनडातील राजकीय विरोधकांच्या हत्यांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रे आणि शक्यतो इतर देशांमध्येही हा प्रयत्न केला गेला आहे. नवा भारत हा धोकादायक आहे, तो सुरक्षित ठेवत नाही तर असुरक्षित करतो," असे अक्रम यांनी म्हटलं.

दुसरीकडे, अक्रम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. हे लोक इतके घाबरले आहेत की त्यांना स्वप्नातही पाकिस्तानचे अणुबॉम्ब दिसतात. असे सरकार आणि नेते देश चालवू शकतात का?, असे पंतप्रधान मोदी एक सभेत म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना अक्रम यांनी पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असं म्हटलं. 

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना अज्ञातांनी संपवले होते. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने एका वृत्तात दावा केला होता की, भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये हत्या केल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndian Armyभारतीय जवान