शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 15:39 IST

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख

Pakistan India, Nawaz Sharif: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. देशातील जनतेला पक्ष विविध आश्वासने देत आहेत. या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचाही उल्लेख केला आहे. जाहीरनाम्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र यासोबतच त्यांनी भारतासाठी एक अटदेखील ठेवली आहे.

भारतासाठी अट कोणती?

PML-N च्या जाहीरनाम्यात भारतासह इतर देशांसोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. देशांना शांततेचा संदेश देण्याचे वचन दिले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या अटीवर पाकिस्तानकडून भारताशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले जातील. ऑगस्ट २०१९ चा निर्णय मागे घेतला तर पाकिस्तान भारताशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

"जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग"

PML-N कडून जाहीरनाम्यात जरी अशा अटीचे आश्वासन देण्यात आले असले तरी ही अट भारत कधीच पूर्ण करणार नाही. एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा भारताने जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये भारतीय संसदेने कलम ३७० च्या तरतुदी रद्द करणे ही भारताची आणि राज्यघटनेची अंतर्गत बाब असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे ही अट ठेवणे PML-N साठी किती फायद्याचे ठरेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

PML-N च्या जाहीरनाम्यात आणखी काय?

जाहीरनाम्यात पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सुधारणे, हवामान बदलाच्या परिणामांशी लढा देणे, लोकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणे, वीज बिलांत २० ते ३० टक्के कपात करणे, तसेच दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण असे आश्वासनही देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात देशाच्या प्रगतीवर भर देण्यात आला आहे. PML-N ने आपल्या अधिकृत X खात्यावर 'पाकिस्तान को नवाज दो' अशा नावाचा जाहीरनामा शेअर केला आहे.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारत