शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

पाक मीडियाचा कर्णधार, कोचवर हल्लाबोल

By admin | Published: March 21, 2016 2:23 AM

ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, पाकिस्तानी मीडियाही संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले

कराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, पाकिस्तानी मीडियाही संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले आहे. त्यांनी कर्णधार आणि प्रशिक्षकांना या पराभवाबद्दल जबाबदार धरले आहे.पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात चार तेज गोलंदाज खेळवण्याची रणनीती चुकीची होती, असे सर्व माध्यमांनी ठासून सांगितले आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे, की खेळपट्टी ओलसर असताना असा निर्णय होतोच कसा? डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवणे संघाला महागात पडले. सामन्याच्या पहिल्या षटकापासून चेंडू वळत होते. संघाच्या थिंक टँकने इमादला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून क्रिकेट समीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. संघव्यवस्थापनास खेळपट्टीचा अंदाज येत नसेल तर याला काहीच अर्थ उरत नाही.‘द नेशन’ या वृत्तपत्राने ‘क्रिकेटमध्ये मुलांपेक्षा मुलीच भारी’ अशा आशयाचे हेडिंग देऊन संघाच्या पराभवाची हेटाळणी केली आहे. ‘द डेली टाईम्स’ने पाकिस्तानी संघाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाची नोंद घेत ‘दुर्दैवाचा फेरा सुरूच’ अशा आशयाचा मथळा दिला आहे. पाकिस्तानी चाहते संतप्तकराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा राग अनावर झाला. अनेकांनी याबद्दल आफ्रिदीला जबाबदार धरले तर काहींनी आपला राग टीव्ही सेटवर काढला. धोनीने विजयी धाव घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताच निराश झालेले पाकिस्तानी चाहते संघाच्या गचाळ कामिगिरीची गटागटाने चर्चा करीत होते. काही ठिकाणी चाहते इतके भडकले होते, की त्यांनी आपले टीव्ही सेट फोडून टाकले. काही ठिकाणी संघाच्या आणि पीसीबीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवत माजी कसोटीपटू बासित अली यांनी याबद्दल माजी कर्णधार इम्रान खान याला जबाबदार धरले. त्याने जाणीवपूर्वक संघाला चुकीचा सल्ला दिला, असे अली यांनी म्हटले आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही या निर्णयावर भडकला. तो म्हणाला, ‘‘आफ्रिदी हा फिरकी गोलंदाज नाही. संघात एक स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज हवा होता.’’ माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक म्हणाला, ‘‘खेळपट्टी ओळखण्यात आपली चूक झाली. चार तेज गोलंदाज खेळवावेत, अशी ही खेळपट्टी नव्हती. न्यूझीलंडने टीम साउदीसारख्या गोलंदाजाला बाहेर बसवून तीन फिरकी गोलंदाज खेळवले, यावरून आपण बोध घ्यायला हवा होता.’’ संघाची निवड चुकीची होती, असे मत रमीझ राजा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सामन्याच्या आधी एक दिवस चार तेज गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे.’’