शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:14 IST

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट (Pakistan Economic Crisis) झाली आहे. येथील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. महागाईने होरपळलेली जनता कधी पिठासाठी भांडताना दिसून येते, तर कधी पेट्रोलच्या किमती (Petrol Price in Pakistan) वाढल्यामुळे आक्रोश करताना दिसते. 

दरम्यान, वाढत्या महागाईदरम्यान पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकार आणि जनता प्रचंड अस्वस्थ आहे. तिजोरी भरण्यासाठी शाहबाज सरकार जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ केली असून या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाळपोळ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल एका पाकिस्तानी नागरिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमावाने पेट्रोल पंप पेटवताना दिसत आहे. या यूजरने सांगितले की, देशात पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ झाल्याने लोक संतप्त झाले असून त्यांनी लाहोरमध्ये एका पंपाला आग लावली. या घटनेनंतर पंपातून धुराचे लोट दूरवरून दिसत होते.

वाढत्या महागाईमुळे लोक हैराण दरम्यान, पाकिस्तानमधील वाढत्या महागाईमुळे येथील लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल ते पीठाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील शहरांमध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 220.4 रुपये, दुधाचा भाव 114.8 रुपये प्रति लिटरवरून 149.7 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पीठ 150 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. तसेच, मोहरीचा भाव पाचशे रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 249.80 रुपये प्रति लीटर, हाय-स्पीड डिझेल 262.80  रुपये प्रति लिटर, रॉकेल 189.83 रुपये आणि हलके डिझेल 187 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

श्रीलंकेत सुद्धा आर्थिक परिस्थिती होती बिकट श्रीलंकेत गेल्यावर्षी महागाई आणि हिंसाचाराने थैमान माजवले होते. आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेत भीषण स्थिती निर्माण झाली होती. यानंतर हजारो निदर्शकांनी थेट तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसल्यानंतर पुढील धोका लक्षात घेत तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल