शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 22:20 IST

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे.

Pakistan Election: गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धूम सुरू आहे. काल रात्र आणि आज दिवसभरापासून सुरू असलेली मतमोजणी अंतिम टप्प्यात असून इम्रान खान यांच्या पक्षासोबतच नवाझ शरीफ यांनीही आपल्या पक्षाच्या विजयाचे मोठे दावे केले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनी सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. 

मतमोजणीदरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यामुळे बहुतांश उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता पाकिस्तानचे भविष्य अपक्षांच्या हाती असणार आहे.

अपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्ननवाझ शरीफ यांनी शुक्रवारी लाहोरमध्ये समर्थकांना संबोधित करताना म्हटले की, आम्ही सर्व पक्ष जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. देशात नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही. आम्ही आमचे शेजारी आणि जगातील इतर देशांशी संबंध सुधारू, असंही ते यावेळी म्हणाले.

शेहबाज शरीफ यांच्यावर जबाबदारी

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी चर्चा करत आहोत. मी शेहबाज शरीफ यांना आसिफ झरदारी, मौलाना फजल उर रहमान आणि एमक्यूएम नेत्यांना सरकार स्थापन करण्यासाठी भेटण्यास सांगितले आहे. पाकिस्तानला किमान 10 वर्षे स्थिरतेची गरज आहे. जे लोक संघर्षाच्या मनस्थितीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणतेही युद्ध नको आहे. पाकिस्तान हे सहन करू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र बसून प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पाकिस्तानला 21 व्या शतकात नेले पाहिजे. ही फक्त माझी किंवा इशाक दार यांची जबाबदारी नाही. हा सगळ्यांचा पाकिस्तान आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केले तरच पाकिस्तान या संकटातून बाहेर पडू शकेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूकInternationalआंतरराष्ट्रीयNawaz Sharifनवाज शरीफImran Khanइम्रान खान