शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:48 IST

नवाझ शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

Nawaz Sharif Pakistan vs India: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात स्वत:चा देश पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही टीका केली आहे. 'जरा भारताकडे बघा, तो देश आज चंद्रावर पोहोचला आहे, त्यांची चंद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली आहे. पण पाकिस्तान अजूनही जमिनीवरच येत आहे. या आर्थिक संकटाला सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे. नियोजन नीट असते तर आज पाकिस्तानही फार पुढे असता. नवाझ शरीफ नुकतेच असेही म्हणाले होते की, देशाच्या आर्थिक संकटाला भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

ब्रिटनमधून परतलेले नवाझ शरीफ सध्या पुन्हा एकदा आपले राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि त्याआधी ते सतत रॅलीच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या आर्थिक संकटासाठी पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान खान यांच्या सरकार जबाबदार आहे. आमचा शेजारी चंद्रावर पोहोचला आहे पण आम्ही अजूनही जमिनीवरच आहोत आणि हे सतत घडत आहे, असे ते म्हणाले.

आर्थिक संकटाला भारत जबाबदार नाही

पाकिस्तानच्या आजच्या आर्थिक संकटाला अमेरिका, भारत किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही, असे नवाझ शरीफ म्हणाले. नवाझ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. २०१८च्या निवडणुकीत फसवणूक करून इम्रान खान यांनी सत्ता बळकावली असा आरोप करत त्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले आहे.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारतChandrayaan-3चंद्रयान-3