शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:03 IST

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा डाव फसला.

नवी दिल्ली - पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षी पाकिस्ताननं यूएनमध्ये भारताला घेरण्यासाठी पॅलेस्टाईनमधील फोटो दाखवत, संबंधित फोटो काश्मीरमध्ये भारताकडून होणाऱ्या अत्याचाराचा पुरावा असल्याचा कांगावा केला होता. यानंतर भारतानं पाकिस्तानचा खोटारडा चेहरा जगासमोर आणला. पाकिस्तान पुन्हा तिच चूक करत आहे. कहर म्हणजे यावेळेस स्वतःकडूनच पसरवला जाणार दहशतवाद भारताचा असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानकडून मारल्या जात आहेत.  

'जम्मू काश्मीरमध्ये भारताकडून होणार अत्याचार' या शीर्षकांतर्गत 20,000 पानांचे 20 पोस्टल स्टॅम्प पाकिस्तानकडून छापण्यात आले आहेत. या स्टॅम्पमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वानीचाही समावेश आहे. संतापजनक बाब म्हणजे पाकिस्ताननं त्याला शहीद असे म्हटलं आहे. पण हा कांगावा करताना पाकिस्ताननं मोठी चूक केली आहे. काश्मिरी पंडित आणि शीखांवर पाकिस्ताननं केलेले हल्ले भारताकडून करण्यात आल्याचा खोटा दावा केला आहे. मात्र सत्य जगजाहीर आहे. आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा पाकिस्तानचा डाव फसला आहे.

काश्मीरमधील एका संघटनेनं यूएन सेक्रेटरी जनरलसोबत पत्रव्यवहार करत अशाच एका स्टॅम्पबाबतचे सत्य उघड केले. या स्टॅम्पमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांमधील भारतीय पीडितांचे फोटो आहेत. यूएनमध्ये तक्रार करणाऱ्या संघटनेनं लिहिले आहे की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. केवळ आमचे अस्तित्व राखण्याचीच नाही तर पाकिस्तान समर्थित दहशतावादाचा प्रभाव रोखण्याचीही जबाबादारी तुमच्यावर आहे. शिवाय, पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेले हे स्टॅम्प मागे घेण्यात यावेत.'

पाकिस्तानी मीडियानुसार, हे स्टॅम्प छापण्याची कल्पना कोणाची होती, याबाबत ठोस अशी माहिती नाही. मात्र या प्रस्तावाला सुरुवातीला माहिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओकडून मंजुरी देण्यात आली होती.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानTerrorismदहशतवाद