शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ

By admin | Published: January 20, 2016 3:44 PM

पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - अफगाणिस्तानवर नियंत्रण  रहावे यासाठी पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे मत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
 
त्यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
 
'पाकिस्तानला एक कडवा इस्लामिक देश बनवणे तसेच पाकिस्तानच्या तुरूंगात खितपत पडलेल्या 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेतील अनेक दहशतवाद्यांची मुक्तता करणे' या दोन प्रमुख मागण्या करत 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची २००९ पासून चर्चा सुरू आहे. मात्र ती सतत अपयशी ठरत असल्याने ही संघटना व पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होतं. आज पेशावरमधील युनिव्हर्सिटीवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारीही याच संघटनेने घेतली आहे. यापूर्वी त्यांनी गेल्यावर्षी लष्करी शाळेवर हल्ला करत लष्करी अधिका-यांच्या शेकडो मुलांना निर्घृणपणे ठार मारले होते. 
१५ जून २०१५मध्ये नवाज शरीफ यांनी या संघटनेविरोधात एका लष्करी मोहिमेची घोषणा केली. पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमारेषेला लागून असलेल्या 'फटा' (Federally Administered Tribal Area) या प्रदेशात तहरीक-ए-तालिबान वा धार्मिक मूलतत्ववादी संघटनांचे फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून पाकिस्तानने या क्षेत्रावर लष्करी कारवाई केली. गेल्या वर्षभरात पाकिस्तानचे जवळपास ४० हजार सैन्य या भागात असून त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर कारवाई करत अनेक अतिरेक्यांना मारले आणि हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकेची मदत घेतली. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरिक-ए-तालिबान संघटनेतील अनेक लहान मुले व स्त्रिया मारल्या गेल्या आणि त्याचाच सूड उगवण्यासाठी या संघटनेने गेल्या वर्षी लष्कराच्या शाळेवर आणि आज विद्यापीठावर दहशतवादी हल्ला करत लहान मुलांना, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. 
पाकिस्तानने लष्करी कारवाई थांबवावी, चर्चा करावी आणि तहरीकच्या अतिरेक्यांना तुरूंगातून सोडावे ही तालिबाची मुख्य मागणी असून ते अशा कारवाया करून पाकिस्तावर दबाव आणत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचे एकंदर धोरण दुटप्पी असून अफगाणिस्तानच्या राजकारणावर आपलं नियंत्रण व प्रभाव रहावा म्हणून पाकिस्तानच्या लष्करानेच हा तालिबानचा ग्रुप वाढवला, मात्र आता तोच त्यांच्यावर उलटला आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता, राजकारणी व लष्कराने आता आत्मपरीक्षण करून दहशतवादाविरोधात ठामपणे उभं राहण्याची वेलव आली आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर ( परराष्ट्र धोरण विश्लेषक)