शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:09 PM

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे.

Bangladesh Crisis : बांगलादेशात शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर सरकार कोसळलं आहे. आरक्षणाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी पायउतार व्हावे लागले. रविवारी आंदोलन चिघळल्यानंतर देशभरात हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर  शेख हसीना यांनी देश सोडला. अशातच बांगलादेशमधील आंदोलन पेटण्यामागे चीन आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय  यांचा सहभाग असल्याची शंका भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशातील सरकार उलथवून टाकण्याबाबत गुप्तचर विभागाच्या अहवालातून याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यास आणि बांगलादेशात विध्वंस वाढवण्यात पाकिस्तानची आयएसआय आणि त्यांना आश्रय देणारा चीन असल्याचे म्हटलं जात आहे. पाकिस्तानने हिंसाचार भडकावण्यासाठी छात्रशिविर नावाच्या संघटनेचा वापर केला. ही विद्यार्थी शिबिर संघटना बांगलादेशातील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीचा एक भाग आहे. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी, स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांवर बंदी घातली होती.

लंडनमध्ये आखली हिंसाचाराची योजना

बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यवाहक प्रमुख खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्या संगनमताचे पुरावेही आहेत. लंडनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने बांगलादेशातील हिंसाचाराची योजना तयार करण्यात आली. ब्ल्यू प्रिंट तयार केल्यानंतर बांगलादेशात ही योजना लागू करण्यात आली. सोशल मीडिया हँडल एक्सवर शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी ५०० हून अधिक पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी हँडल्सचाही समावेश आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेला बांगलादेशात हिंसाचार भडकावणे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय आंदोलनात रूपांतर करण्याचे काम दिलं होते.

पाकिस्तान थेट बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटलं जात असताना यामागे भारताचा विरोधी चीन असल्याचा दावा केला जातोय.चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या शेजारी असणाऱ्या सहा देशांवर नियंत्रण ठेवत असून, भारतासमोरील अडचणी वाढवत आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडली भारतालाही धोका निर्माण झाल्याचे म्हटलं आहे. चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर नियंत्रण ठेवलं असून जे भारतविरोधी डावपेच आखत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. भारतासोबतच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि म्यानमारवर चीनचा प्रभाव वाढत आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल आणि तेथील हिंदूंवर हल्लेही वाढतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशchinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत