शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 9:25 PM

Pakistan on Jammu-Kashmir : शहबाज शरीफ यांनी बुरहान वानीचा मुद्दा उपस्थित करत भारतावर टीका केली.

Pakistan on Jammu-Kashmir : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 79 व्या अधिवेशनाला संबोधित केले. शरीफ यांनी आपल्या भाषणात गाझा येथील इस्रायली हल्ल्यावर जोरदार टीका केली. यासोबतच, त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाबत गरळ ओकली. भारत काश्मिरींचे हक्क हिरावून घेत आहे. सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काढून घेतलेला काश्मीरचा विशेष दर्जा परत करावा, असे शरीफ म्हणाले. 

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे भारतकलम 370 हटवण्यासारखे पाऊल उचलू शकत नाही. भारत काश्मीरची संरचणा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात बाहेरुन लोकांना आणून वसवले जात आहे. हे थांबले पाहिजे, आम्ही याचा निषेध करतो. भारताने कलम 370 लागू करावे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

बुरहान वानीला काश्मिरी विसरले नाहीतयावेळी शरीफ यांनी दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख केला. ते म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन करत आहे. सरकारची दडपशाही असूनही काश्मीरमधील जनता बुरहान वानीला विसरलेली नाही. बुरहानची विचारधारा काश्मीरींच्या मनात कायम आहे. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

भारत आक्रमकता दाखवतोय, त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारताने कोणतीही आक्रमकता दाखवल्यास पाकिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. भारताने पाकिस्तानच्या सकारात्मक प्रस्तावांना प्रतिसाद दिला नाही, जे निराशाजनक आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370