शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 21:26 IST

Pakistan on Jammu-Kashmir : शहबाज शरीफ यांनी बुरहान वानीचा मुद्दा उपस्थित करत भारतावर टीका केली.

Pakistan on Jammu-Kashmir : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 79 व्या अधिवेशनाला संबोधित केले. शरीफ यांनी आपल्या भाषणात गाझा येथील इस्रायली हल्ल्यावर जोरदार टीका केली. यासोबतच, त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाबत गरळ ओकली. भारत काश्मिरींचे हक्क हिरावून घेत आहे. सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काढून घेतलेला काश्मीरचा विशेष दर्जा परत करावा, असे शरीफ म्हणाले. 

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे भारतकलम 370 हटवण्यासारखे पाऊल उचलू शकत नाही. भारत काश्मीरची संरचणा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात बाहेरुन लोकांना आणून वसवले जात आहे. हे थांबले पाहिजे, आम्ही याचा निषेध करतो. भारताने कलम 370 लागू करावे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

बुरहान वानीला काश्मिरी विसरले नाहीतयावेळी शरीफ यांनी दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख केला. ते म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन करत आहे. सरकारची दडपशाही असूनही काश्मीरमधील जनता बुरहान वानीला विसरलेली नाही. बुरहानची विचारधारा काश्मीरींच्या मनात कायम आहे. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

भारत आक्रमकता दाखवतोय, त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारताने कोणतीही आक्रमकता दाखवल्यास पाकिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. भारताने पाकिस्तानच्या सकारात्मक प्रस्तावांना प्रतिसाद दिला नाही, जे निराशाजनक आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370