शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी घेणार नाहीत वेतन, देशातील आर्थिक संकट पाहता घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:01 IST

Pakistan President Asif Ali Zardari : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

Pakistan President Asif Ali Zardari : पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपले वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपल्या देशाची वाईट स्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अशा परिस्थितीत नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानमधील आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपतीपदाच्या काळात कोणतेही वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वेतन न घेतल्याने पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवता येणार नाही. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाईचा मोठा सामना या देशाला करावा लागत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानवर असलेला कर्जाचा बोजा वाढत आहे. पाकिस्तानचे विदेशी कर्ज गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1.2 अब्ज डॉलरने वाढून 86.35 अब्ज डॉलर होते. ज्यामध्ये जागतिक बँक आणि चीनचा सर्वाधिक वाटा होता.  68 वर्षीय आसिफ अली झरदारी यांनी गेल्या रविवारी 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पीपीपीने 'एक्स' वर लिहिले आहे की, राष्ट्रपतींनी विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्याचे आणि राष्ट्रीय महसुलावर भार न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रपतींच्या सचिवालय प्रेस विंगने सांगितले की, राष्ट्रीय महसुलावर बोजा पडू नये म्हणून राष्ट्रपतींनी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानचे गृहमंत्रीही घेणार नाहीत वेतनपाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी इस्लामाबादमधील ऐवान-ए-सदर येथे आयोजित समारंभात दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. याशिवाय, आसिफ अली झरदारींच्या पावलावर पाऊल ठेवत गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही देशासमोरील आर्थिक आव्हानांचे कारण देत वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे राष्ट्रपतीआसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले आहेत. यापूर्वी 2008 ते 2013 दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील राष्ट्रपतींना पदभार सोपवला होता. बेनझीर भुट्टो सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मात्र, सरकार पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान