शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 4:08 PM

भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने या प्रश्नावरून जागतिक पातळीवर रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. पण...

इस्लामाबाद - भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने या प्रश्नावरून जागतिक पातळीवर रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. भारताला युद्धाचीही धमकी दिली होती. मात्र हे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता पाकिस्तान काश्मीर प्रश्न पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला भारतोसोबत चर्चा करण्यात काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीरबाबतच्या द्विपक्षीय चर्चेत काश्मीर हा तिसरा पक्ष आहे. त्यामुळे काश्मिरी नेत्यांची भेट घेण्याची परवानगी मिळावी, अशी अट त्यांनी घातली आहे. शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेसाठी कधीही नकार दिलेला नाही. तसेच द्विपक्षीय चर्चेत कुणी तिसरा पक्ष मध्यस्थी करणार असेल तर त्याचेही आम्ही स्वागतच करू. मात्र भारताच्या बाजूने चर्चेसाठी अनुकूल वातावरण दिसत नाही. तसेच काश्मीरप्रश्नी तीन पक्ष आहेत. भारत-पाकिस्तान आणि काश्मीर. त्यामुळे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नजरकैदेत असलेल्या काश्मिरी नेत्यांना मुक्त करावे.'' 

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेसाठी पाकिस्तानने एक अटही घातली आहे. आम्हाला काश्मिरी नेत्यांना भेटण्याची परवानगी मिळाली पाहिजे. जेणेकरून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना चर्चेसाठी तयार करता येईल, असा दावा कुरेशी यांनी केला आहे. दरम्यान, भारताने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारतासोबत कुठलीही चर्चा करणार नसल्याची धमकी दिली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान