शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

पाकिस्तान म्हणतो भारतासोबत चर्चेला तयार, पण....

By admin | Published: March 23, 2017 5:20 PM

भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कोणत्याही वेळेची किंवा घटनेची गरज नसते. वेळ आणि क्षण कोणताही असो, काश्मीरचा मुद्दा आलाच पाहिजे. पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'काश्मीर लोकांच्या इच्छेप्रमाणे यावर तोडगा काढला पाहिजे', असं मत व्यक्त केलं आहे. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले आहेत. 'काश्मीर मुद्यासहित इतर मुद्देही चर्चेच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत', असंही ते बोलले आहेत. 
 
पाकिस्तान डे च्या निमित्ताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ध्वजरोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतासोबत करण्यात येत असलेली चर्चेची मागणी आमचा दुबळेपणा नसून आमची ताकद आहे असं अब्दुल बसित बोलले आहेत. बासित यांनी यावेळी सांगितलं की, 'द्विपक्षीय मुद्यांवर पाकिस्तानची मुळं आंतरराष्ट्रीय कायद्याशी जोडली गेली आहेत. शांतता प्रस्थापित करणं हेच आमचं धोरण आहे. खासकरुन आशियामध्ये आम्ही शेजारी राष्ट्रांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो'.
 
काश्मीर मुद्याचा उल्लेख करताना बासित बोलले आहेत की, 'जिथपर्यंत जम्मू आणि काश्मीर मुद्द्याचा प्रश्न आहे, तो काश्मीरमधील लोकांच्या इच्छेप्रमाणे सोडवला गेला पाहिजे आणि असंच होईल अशी आमची आशा आहे'. 'काश्मीर लोकांचा संघर्ष दाबला जाऊ शकतो, मात्र त्याला संपवलं जाऊ शकत नाही', असंही ते बोलले. 'काश्मीर लोक जे संघर्ष करत आहेत, त्यात त्यांना यश मिळो', असं बासित यांनी म्हटलं आहे.
 
'शांततेत दोन्ही देशांचं हित लपलं असून शांततेच्या मार्गानेच स्थायी शांतता आणली जाऊ शकते', असं मत बासित यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.