शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाकिस्तान एक दहशतवादी देश - भारत

By admin | Published: September 22, 2016 10:16 AM

नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्यावरुन भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्ये सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

संयुक्त राष्ट्र, दि. २२ - संयुक्त राष्ट्रामध्ये नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्यावरुन भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्ये सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान एक दहशतवादी देश असून, दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानचे जे जुने धोरण आहे त्यातून पाकिस्तान भारता विरोधात युद्ध गुन्हे करत आला आहे असे भारताने म्हटले आहे. 
 
संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे असे दहशतवादी पाकिस्तानच्या रस्त्यावर राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मोकळेपणाने फिरत आहेत असे भारताने म्हटले आहे. मानवी हक्काचे सर्वात वाईट उल्लंघन कुठले असेल तर तो दहशतवाद आहे असे संयुक्त राष्ट्रातील परमनंट मिशनमधील भारताच्या सचिव इनाम गंभीर म्हणाल्या. 
 
आणखी वाचा 
नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख
भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?
 
दहशतवादाचा तुम्ही धोरणासारखा वापर करता तेव्हा तो युद्ध गुन्हा ठरतो. दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानच्या धोरणाचे परिणाम भारत आणि अन्य शेजारी देशांना भोगावे लागत आहेत. आज जगातील अनेक देश यामुळे त्रस्त आहेत असे त्या म्हणाल्या. 
 
भारत पाकिस्तानकडे दहशतवादी देश म्हणून बघतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीच्या स्वरुपात मिळणा-या अब्जावधी डॉलर्सचा पाकिस्तान दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपयोग करतो असे भारताने म्हटले आहे.