शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 7:57 PM

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारी देश पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या भीषण पुराशी झुंज देत आहे. कोट्यवधी लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महागाई गगनाला भिडत आहे. दरम्यान, लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हे पाहता पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करणार आहे.

पाकिस्तान पुन्हा भारतोसोबत व्यापार सुरू करणार असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी सोमवारी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्या हवाल्याने दिले. पाकिस्तान भारतासोबत व्यापार (खुला व्यापार मार्ग) पुन्हा सुरू करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी ही केली, "या पूर आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरू करू,” असे ते म्हणाले.

"रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे ५०० आणि ४०० रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या,” अशी माहिती लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

भारताची भूमिका काय?अटारी-वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो, कांद्याचा पुरवठा केला जात आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा म्हणाले की, पुरामुळे बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. “सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. इराणमधून ताफतान सीमेवरून (बलुचिस्तान) भाजीपाला आयात करणे तितके सोपे नाही.0 इराण सरकारने आयात आणि निर्यातीवर कर वाढवला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत