शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागणार होता; पण एका कारणामुळे विचार बदलला, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:17 PM

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र डागणार होता

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतीय क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे याबद्दल तक्रार केली आहे. क्षेपणास्त्र प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे. 

भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर कोसळल्यानंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान तितक्याच क्षमतेचं क्षेपणास्त्र डागणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. त्यामुळे क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय पाकिस्तानकडून रद्द करण्यात आला.

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागलं जाणार होतं. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान ही कारवाई करणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याचे संकेत तपासातून मिळाले. त्यानंतर पाकिस्ताननं आपला निर्णय बदलला आणि पुढील अनर्थ टळला. ब्लूमबर्गनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

भारताचं एक क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात कोसळलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही रहिवासी इमारतींचं नुकसान झालं. भारतानं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. नियमित देखभाल केली जात असताना चुकून क्षेपणास्त्र डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. या घटनेच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान