शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

...म्हणून पाकिस्तानात महागाई कमी होत नाही, भारताप्रमाणे नोटाबंदी करा, अर्थतज्ज्ञाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 9:55 AM

पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात गरिबी एवढी आहे की, येथील लोकांवर अन्नासाठी भीक मागण्याची वेळ ओढावली आहे. गरीबीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेकवेळा आयएमएफकडे हात पुढे केला आहे. तरीही एक-दोनच देश मदतीसाठी पुढे आले आहेत, जे त्यासाठी पुरेसे नाही. 

दरम्यान, पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी भारताकडून प्रेरणा घेऊन त्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. पण भारताचा मार्ग अवलंबून पाकिस्तान आपली गरिबी कमी करू शकेल का? जाणून घ्या...

बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, देशात 5 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली पाहिजे. अलीकडेच अम्मार खान यांचा एक पॉडकास्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी 5 हजाराची नोट बंद करण्याचा सल्ला दिला आहे. 

अम्मार खान म्हणाले की, भारताने नोटाबंदीच्या फॉर्म्युलावर चांगले काम केले. त्यामुळे भारताच्या कर संकलनाचे आश्चर्यकारक परिणाम बघायला मिळाले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने हा मार्ग अवलंबला तर कदाचित काही सुधारणा दिसून येईल. दरम्यान, 2016 मध्ये भारतात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या.

सर्कुलेशन आहेत 8 ट्रिलियन अम्मार खान पुढे सांगतात की, पाकिस्तानमध्ये सुमारे 8 ट्रिलियन रुपये तपासाशिवाय सर्कुलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत या 5 हजारांच्या नोटांवर बंदी घातली तर हे सर्व सर्कुलेशन येईल. पाकिस्तानमध्ये डिजिटल पेमेंट नाही, त्यामुळे येथे बहुतांश व्यवहार रोखीनेच केले जातात. तसेच, याठिकाणी आयात निर्यातीचे सर्व काम अमेरिकन डॉलरमध्ये केले जाते.

श्रीमंत लोकांकडे असते 'ही' नोटबहुतेक श्रीमंत लोकांकडे 5 हजाराची नोट आहे. अशा स्थितीत नोटाबंदीसारखा निर्णय येथे घेतल्यास सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यापेक्षा इथल्या बड्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो आणि विरोधही होऊ शकतो. अम्मार खान म्हणाले की, नोटाबंदीमुळे जे 8 ट्रिलियन रुपये सर्कुलेशनमध्ये नाहीत, ते बँकांना मिळू शकले नाहीत, ते बँकांना परत मिळतील. त्यामुळे येथील परिस्थितीही काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान