शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप

By admin | Published: November 03, 2016 3:00 PM

पाकिस्तान रडीचा डाव खेळत असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / नवी दिल्ली, दि. 3 - पाकिस्तानी हेराची पोलखोल करुन त्याला पुन्हा मायदेशी पाठवल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे. आठ भारतीय अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून त्यांची नावेही उघड केली आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. 
 
भारताने अगोदरच अधिका-यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील मोहम्मद अख्तर या अधिका-याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सुटका केली होती. त्यानंतर भारताने मोहम्मद अख्तर याच्यासहित सहा अधिका-यांना तातडीने भारत सोडून जायला सांगितले होते.  
 
 
पाकिस्तानने सुरुवातीला फक्त दोन अधिका-यांवर आरोप केले होते, मात्र बुधवार संध्याकाळपर्यंत आकडा आठवर पोहोचला. हे अधिकारी रॉ किंवा गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताप्रमाणे राजेश कुमार अग्निहोत्री, बलबीर सिंग, अनुराग सिंग, अमरदीप सिंग भट्टी, धर्मेंद्र, विजय कुमार वर्मा, माधवन नंदा कुमार, जयाबालन सेंथिल अशी अधिका-यांची नावे आहेत. मात्र परराष्ट्र खात्याने या नावांना दुजोरा दिलेला नाही.
 
(हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकास अटक)
 
भारतीय अधिकारी हेरेगिरी करत होते, तसंच चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरमध्ये अडथळा आणण्याचा आणि देशात भीती, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे. पाकिस्तानमध्ये खबरींचं जाळं पसरवून, पाकिस्तानविरोधात पुरावे गोळा केले जात होते असाही दावा करण्यात आला आहे. 
 
दरम्यान भारताने तंबी दिल्यानंतर मायदेशी परतलेले पाकिस्तानी अधिकारी मायदेशी पोहोचले आहेत. भारताने केलेल्या कारवाईविरोधात राग म्हणून पाकिस्तान जशास तसं उत्तर देण्यासाठी ही कारवाई करत असल्याचं भारताने म्हटलं आहे.