शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

'बांगलादेशातील गोंधळामागे पाकिस्तानची ISI', शेख हसीना यांच्या मुलाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 8:49 AM

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे.

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात मोठा गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने, जाळपोळ झाली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे. बांगलादेशातील सत्तापालटानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पोहोचलेल्या शेख हसीना यांच्या मुलाने पाकिस्तानवर मोठा दावा केला आहे. बांगलादेशातील अराजकतेसाठी त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला जबाबदार धरले आहे.

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशात अशांतता पसरवल्याबद्दल आयएसआयला जबाबदार धरले असून त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे. शेख हसीना बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, बांगलादेशात लोकशाही बहाल होताच आई आपल्या देशात परतेल. ती नक्कीच पुनरागमन करेल पण ती निवृत्त नेते म्हणून परतणार की सक्रिय नेता म्हणून हे अद्याप ठरलेले नाही.

'शेख मुजीबुर रहमान यांचे कुटुंबीय त्यांच्या लोकांना आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगला सोडणार नाहीत. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण आपल्या लोकांकडे पाठ फिरवू शकत नाही. बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतर ती नक्कीच आपल्या देशात परतणार आहे, असंही ते म्हणाले. 

सजीब वाजेद जॉय यांनी आपली आई शेख हसीना यांच्या सुरक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार मानले आणि बांगलादेशमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली. 'माझ्या आईच्या सुरक्षेसाठी मी भारत सरकारचा मनापासून आभारी आहे, असे जॉय म्हणाले. मी पंतप्रधान मोदींचा ऋणी आहे. भारताला पूर्वेकडील भागात स्थैर्य हवे असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणावा लागेल. बांगलादेशातील 'इंडिया आऊट' मोहिमेबद्दल बोलताना जॉय म्हणाले की, भारतविरोधी शक्ती खूप सक्रिय आहेत आणि अवामी लीगला सत्तेतून बेदखल करून, आयएसआय आता बांगलादेशला पाहिजे तितकी शस्त्रे पुरवू शकते, असंही ते म्हणाले. 

तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा

'भारताने दबाव आणला पाहिजे'

सजीब वाजेद जॉय म्हणाले, शेख हसीना बांगलादेशला परतणार नाही हे खरे आहे. पण गेल्या दोन दिवसात बरेच काही बदलले आहे. आता आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते करू. आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही. अवामी लीग हा भारताचा सहयोगी असल्याचे सांगून जॉय म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. यासोबतच त्यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन अंतरिम सरकारला देशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत ठेवण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान