शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पाकने काश्मीर मुद्दा युनोत मांडणे हा हस्तक्षेप - भारत

By admin | Published: October 16, 2015 4:07 AM

पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन

संयुक्त राष्ट्र : पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन आणि आपल्या अंतर्गत कारभारात स्पष्ट ढवळाढवळ असल्याचे म्हटले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून पुढेही राहील, असेही भारताने स्पष्टपणे बजावले.संयुक्त राष्ट्रात पाकच्या मुत्सद्याने केलेल्या वक्तव्यांवर प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा उपयोग करताना संयुक्त राष्ट्रातील भारतीय मिशनचे सचिव अभिषेक सिंह म्हणाले की, पाकने प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करण्याऐवजी आत्मपरीक्षण करून तो देश कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहिले पाहिजे. संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या सत्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मिरी लोक काश्मीर वादाच्या केंद्रस्थानी असून हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास त्यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. चर्चेसाठी काश्मिरींशी विचारविनिमय न करणे ही पूर्वअट मान्य होऊ शकत नाही. यातून काही निष्कर्षही निघणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. सिंह म्हणाले की, भारताचा निम्मा जम्मू-काश्मीर गिळंकृत करणाऱ्या देशाने अशी विधाने करणे हास्यास्पद आहे. पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारतात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल सिंह यांनी दु:ख व्यक्त केले.