शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; 'म्हणे शांतता आम्हाला हवीय, पण भारताला नकोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 11:28 PM

युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे.

कराची : युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे. इंटरप्ले ऑफ इकॉनॉमी अँड सिक्युरिटी वर येथे बुधवारी झालेल्या चर्चासत्रात बाज्वा बोलत होते. ते म्हणाले की, भारतासोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आमची बाह्य आघाडी नेहमीच अस्थिर राहिली आहे. आमच्या पूर्वेला युद्धखोर भारत आणि पश्चिमेला अस्थिर अफगाणिस्तान आहे. ऐतिहासिक गोष्टींमुळे आणि नकारात्मक स्पर्धेमुळे हा भाग जखडलेला आहे, असे बाज्वा म्हणाले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन्ही सीमांवर असलेल्या अस्थिर परिस्थितीवरही भाष्य केलं.

तणावग्रस्त परिस्थितीचे रूपांतर धोक्यांमध्ये व्हायच्या आधी ती बदलायला हवी आणि त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. बाज्वा यांनी देशाच्या प्रचंड वाढत्या कर्जाबद्दल काळजी व्यक्त केली. पाकिस्तानला भिकेचे भांडे फेकून द्यायचे असेल तर सकल देशी उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी असलेले कर प्रमाण बदलावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. देशासाठी नंतर धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचा सामना आताच करायला हवा, असेही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी म्हटले. देशाच्या बुडीत चाललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत