शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

सत्तेसाठी राजपक्षे यांनी केला बंडाचा प्रयत्न !

By admin | Published: January 12, 2015 12:06 AM

श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता,

कोलंबो : श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता, असे उघड झाले असून, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश नव्या सरकारने दिले आहेत. नव्या सरकारकडून सर्वात आधी माजी अध्यक्ष राजपक्षे यांच्या बंडाची, तसेच कटकारस्थानाची चौकशी केली जाईल, असे नवे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना यांच्या सरकारचे प्रवक्ते मंगला समरवीरा यांनी पत्रकारांना सांगितले. लष्कर प्रमुख व पोलीस महानिरीक्षक यांनी राजपक्षे यांना साथ देण्यास नकार दिल्यानंतर राजपक्षे यांनी सत्ता सोडली. राजपाक्षे (६९) यांनी पराभव स्वीकारल्याबद्दल शुक्रवारी त्यांची प्रशंसा होत होती. मतमोजणीची अखेरची फेरी पूर्ण होण्याआधीच त्यांनी पराभव मान्य केला होता. राजपक्षे यांनी मुदत संपण्याआधीच निवडणूक जाहीर केली होती. हे सत्तांतर शांततेने झाले असे लोकांना वाटत आहे; पण सत्य वेगळेच आहे असे समरवीरा यांनी म्हटले. पोलीस महानिरीक्षक इलांगकून यांनी या कटात सहभागी होण्यास नकार दिला. लष्कर प्रमुखांनी पोलिसांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅटर्नी जनरल यांनी या चालीचे घातक परिणाम होतील असा इशारा दिला होता, असे समरवीरा म्हणाले. नवे अध्यक्ष सिरीसेना यांचे मुख्य प्रवक्ते रजिथा सेनारत्ने यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे यांनी पराभवाचा अंदाज येताच लष्कर प्रमुख लेफ्ट. जनरल दया रत्ननायके यांच्यावर सैनिक तैनात करण्यासाठी दबाव आणला; पण त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यास नकार दिला. अखेर कोणताही पर्याय न राहिल्याने राजपक्षे यांनी सत्ता सोडली व पराभव मान्य केला. लष्कर प्रमुख, पोलीस महानिरीक्षक व निवडणूक आयुक्त यांनी दाखविलेले धैर्य व ठाम विचार याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो, असे सेनारत्ने यांनी सांगितले. त्यांनी मुक्त व निर्भय निवडणुकीची लोकशाही परंपरा कायम ठेवली, असे सेनारत्ने म्हणाले. राजपक्षे यांचा दावा राजपक्षेंच्या प्रवक्त्याने हा आरोप निराधार असल्याचा दावा केला असून असे काही घडलेच नाही असे म्हटले आहे. ९ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता मतमोजणी चालू असताना अध्यक्ष राजपक्षे यांनी आढावा घेतला व निकाल काय येतील याचा अंदाज घेतला, असे मोहन समरनायके यांनी म्हटल्याचे बीबीसीने म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी सर्व सचिवांना आदेश देऊन सत्तांतराचे आदेश दिले. ज्या राजकीय नेत्याने हे आरोप केले आहेत, त्यांना निराधार आरोप करण्याची सवय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)