शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:40 IST

भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत. 

Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत अयोध्येत आज रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. मोठ-मोठ्या शहरांपासून अगदी गावखेड्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशासह जगभरात चर्चा रंगत असताना थायलंड येथीलही अयोध्येसारखंच नाव असलेलं एक ऐतिहासिक शहर चर्चेत आलं आहे.

थायलंड येथील अयुथ्या हे शहर १३५० मध्ये वसवण्यात आलं होतं. हे शहर कधीकाळी एका विशाल साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जात. अयुथ्या शहर हे  बँकॉकपासून ७० किलीमीटर अंतरावर आहे. भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत.  भारताच्या प्राचीन संस्कृतीचा दक्षिण पूर्व आशियावर मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की, जेव्हा अयुथ्याची स्थापना झाली तेव्हा रामामण थायलंडपर्यंत पोहोचलं होतं. थायलंडमध्ये रामायण हे रमाकिएन नावानं ओळखलं जातं. थायलंडचे लोक राजाला भगवान विष्णूचा अवतार मानतात. त्यामुळेच तिथं राजाला रामा-१, रामा-२ अशा नावाने ओळखलं जातं. थायलंडमध्ये संस्कृतसह पाली भाषेचाही प्रभाव पाहायला मिळतो. 

दरम्यान, भारत आणि थायलंडच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना ७७ वर्ष पूर्ण होत असली तरी या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध मात्र अनेक शतकांचे आहेत. १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अयुथ्या हे एक समृद्ध शहर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र १७६७ मध्ये बर्माने या शहरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अयुथ्या शहर उद्धवस्त झालं. परिणामी या शहरात अनेक मूर्ती आणि इमारतीचा सांगाडा आज पाहायला मिळतो.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरThailandथायलंडAyodhyaअयोध्या