शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
3
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
4
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
5
रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
6
Vastu Tips: दररोज रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
7
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
8
'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?
9
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
10
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
11
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
12
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
13
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
14
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
15
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
16
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
17
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
18
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
19
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
20
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

व्यापारावरील अटी शिथिल केल्यास भारत-नेपाळ मतभेद कमी होतील; माजी उपपंतप्रधानांचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 9:43 AM

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला

नारायण जाधव काठमांडू : एकेकाळी भारताचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधील जनतेच्या  मनात  केंद्र सरकारच्या काही निर्णयांमुळे मतभेदाची दरी रुंदावत चालली आहे. संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी भारताने केलेली सीमाबंदी आणि  नंतरच्या काळात दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती कारणीभूत आहेत, असे निरीक्षण नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी यांनी नोंदविले. 

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. नेपाळच्या मधेसी प्रांतात भारताला अधिक रुची आहे, ते हा नेपाळपासून प्रांत तोडून भारताला जोडतील, असा एक समज वाढत आहे. एकीकडे भारताने व्यापारात अटी व शर्ती लादल्या असताना दुसरीकडे  चीनने मात्र  त्या कमी केल्या  आहेत, यामुळे नेपाळी जनतेच्या मनात चीनविषयी सकारात्मक भावना वाढीस लागली आहे, याकडे विमलेंद्रकुमार निधी यांनी लक्ष वेधले. सध्या  त्यांच्याकडे नेपाळमधील सत्ताधारी नेपाळी नॅशनल  काँग्रेसचे  उपाध्यक्षपद असून नेपाळी सत्ताकेंद्रात त्यांचे मोठे राजकीय वजन आहे. नेपाळमध्ये  सध्या स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुका सुरू असून त्यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. 

भूकंपाच्या वेळेस भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे नाराजी नेपाळच्या माजी उपपंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार रामजी दहाल यांच्या मते कालापानी-विपुलेख सीमेवरून जेवढे राजकारण केले जात आहे, ते नेपाळी जनतेसाठी तेवढे महत्त्वाचे नाही. हा दोन्ही देशांतील राजकारण्यांनी तापवलेला मुद्दा आहे. चर्चा करून हा प्रश्न सोडविता येऊ शकतो. मात्र, भूकंपानंतर भारताने नेपाळला पाहिजे तशी मदत तर केली नाहीच, शिवाय वर त्याकाळी सीमाबंदी करून आमच्या जखमेवर मीठ चोळले, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.  आमच्या नव्या घटनेचे भारताने स्वागत करायला हवे होते, असे ते म्हणाले.

भारतासोबतची सीमा सुरक्षितभारतासोबत नेपाळची १८४० किमीची सीमा आहे, ती पूर्णत: सुरक्षित  आहे. इतर देशांसोबतच्या सीमेवर भारत दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करतो, पण नेपाळला  काय देतो, व्यापारात अटी व शर्ती लादतो, असे निरीक्षण नेपाळच्या पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार श्रीकृष्ण अनिरुद्ध गौतम यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ