शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:29 AM

हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

बँकॉक : अन्न असुरक्षितता ही आशियातील जुनी समस्या असून, कोरोना महामारीच्या तुलनेत २०२२ मध्ये ५.५ कोटींपेक्षा अधिक लोकांना दोन वेळचे अन्न न मिळाल्याने ते कुपोषित राहिले, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी, नैसर्गिक आपत्ती, युद्धामुळे अन्नपुरवठ्यात आलेली बाधा, हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगासाठी ३० टक्के धोका

येथील लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अन्न मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनिश्चितता असते आणि पैशाच्या कमतरतेमुळे सतत रिकामे पोट ठेवावे लागले. सतत उपाशी राहिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. जगासाठी हा धोका ३० टक्के तर आशिया आणि पॅसिफिकसाठी २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महिलांवर मोठे संकट

कुपोषण महिलांसाठी सर्वांत वाईट समस्या आहे. आशियातील पाचपैकी एका महिलेला तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. द. आशियामध्ये ४२%महिलांना, तर ३७% पुरुषांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.

युद्धाने घास हिरावला

कोरोनानंतर अन्न, इंधन, खते आणि पशुधनाच्या खाद्याच्या किमती वाढल्याने अन्न सुरक्षा मोहिमेवर परिणाम झाला. युद्धामुळे धान्य, खाद्यतेल पुरवठ्यात व्यत्यय आल्याने  समस्या निर्माण झाल्या आहेत.