Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:06 AM2022-03-04T10:06:10+5:302022-03-04T10:16:59+5:30

Russia Ukraine War : केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

russia ukraine war indian student coming from kyiv got shot and was taken back midway says government | Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली - युक्रेनमधील खारकीव्ह येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. यानंतर आता युक्रेनहून परतणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी कीव्हला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत. तसेच आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असंही व्ही के सिंह यांनी म्हटलं आहे. 

"...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

नवीनच्या मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने सांगितलं. एनडीटीव्हीला त्याने ही माहिती दिली आहे. जीवनावश्यक सामान आणि खाण्यासाठी अन्न पदार्थ संपल्याने नवीनला चिंता लागून राहिली होती. त्यामुळेच तो बाहेर पडला. जर तो यासाठी गेला नसता तर आज जिवंत असता असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही झोपलो होतो. खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला होता. घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता. मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी पैसे ट्रान्सफर केले आणि त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं" असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

 

Web Title: russia ukraine war indian student coming from kyiv got shot and was taken back midway says government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.