शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
5
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
6
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
7
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
8
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
9
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
10
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
11
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
12
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
13
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
14
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
18
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
19
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 5:05 PM

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारत आणि चीन हे दोन देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच म्हटले होते. यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्को दौऱ्यावर गेले. खरे तर या युद्धात भारताच्या भूमिकेडके संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच आता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युद्धासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले, "भारत चार तत्त्वांवर विश्वास ठेवतो. एक म्हणजे, हा शांततेचा काळ असायला हवा, दुसरे म्हणजे, रणांगणावर कुठल्याही प्रकारची समस्या सुटू शकत नाही, तिसरे म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या यशस्वी शांतता प्रक्रियेसाठी रशियाने चर्चेच्या टेबलावर असायला हवे आणि चौथे म्हणजे, भारत ह संघर्ष सोडवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असून चिंतित आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव दौऱ्यांसंदर्भात बोलताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सध्याच्या रशिया दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “युद्धाच्या माध्यमाने वाद सोडविले जाऊ शकतात, यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला वाटते की, जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्यात रशियानेही भाग घ्यायला हवा. राहिला प्रश्न भारताचा, तर हे रशिया आणि युक्रेनच्या इच्छेवर अवलंबून आहे, आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने बोलत आहोत.”

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतAjit Dovalअजित डोवाल