शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

रशियात असं नेमकं काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर की चीनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 11:37 AM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं.

बीजिंग-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं. तसंच यापुढेही रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहिल असंही ठामपणे मत मांडलं. मॉक्सोत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत जयशंकर यांनी केलेलं हे विधान पाश्चात्य देशांना दिलेलं एक खणखणीत प्रत्युत्तर मानलं जात आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून भारतावर वारंवार दबाव वाढत आहे. याआधीही जयशंतर यांनी जागतिक व्यासपीठावरुन भारत-रशिया संबंधांवर केल्या केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. पण अमेरिकेसोबत तणावपूर्ण संबंध राहिलेल्या चीनला मात्र भारताच्या विधानानं आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. 

जयशंकर यांनी केलेल्या विधानाचं कौतुक करत चीनचे सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सचे पत्रकार हू शिजिन यांनी एक ट्विट केलं आहे. "भारत हा एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी असलेला देश आहे, ज्याने जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी दारे उघडली आहेत. भारताचा व्यापक आंतरराष्ट्रीय प्रभाव अमेरिका वगळता इतर अनेक पाश्चात्य देशांना मागे टाकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते", असं ट्विट हू शिजिन यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाले. यानंतर रशियावर एक एक करून अनेक निर्बंध लादले जाऊ लागले. मात्र भारताने तटस्थ धोरण अवलंबून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियात युनायटेड नेशन्सपासून ते एससीओपर्यंत भारताने उघडपणे युद्ध आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे. रशियासोबतच्या व्यापारी संबंधांमुळे पाश्चात्य देश भारतावर नाराज आहेत. दरम्यान, जयशंकर दोन दिवसांच्या दौऱ्यावर मंगळवारी मॉस्कोला पोहोचले. भारत-रशिया संबंधांवर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय मजबूत आणि वेळोवेळी अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहणारे असे संबंध आहेत. कोरोना व्हायरस, आर्थिक दबाव आणि व्यावसायिक अडचणींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता यावर आपण युक्रेन युद्धाचा परिणाम देखील पाहत आहोत. 

संवादातून जागतिक आणि प्रादेशिक समस्या सोडवू"दहशतवाद आणि हवामान बदल या बारमाही समस्या आहेत. दोन्हीचा विकासावर वाईट परिणाम होतो. आमची चर्चा एकूण जागतिक परिस्थिती तसेच काही प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल", असं जयशंकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये, चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने जयशंकर यांच्या विधानाचा हवाला देत म्हटलं होतं की अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आम्ही भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आदर करतो आणि धोरणात्मक संयम पाहून आनंद होतो. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया