शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

रशियात असं नेमकं काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर की चीनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 11:38 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं.

बीजिंग-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं. तसंच यापुढेही रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहिल असंही ठामपणे मत मांडलं. मॉक्सोत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत जयशंकर यांनी केलेलं हे विधान पाश्चात्य देशांना दिलेलं एक खणखणीत प्रत्युत्तर मानलं जात आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून भारतावर वारंवार दबाव वाढत आहे. याआधीही जयशंतर यांनी जागतिक व्यासपीठावरुन भारत-रशिया संबंधांवर केल्या केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. पण अमेरिकेसोबत तणावपूर्ण संबंध राहिलेल्या चीनला मात्र भारताच्या विधानानं आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. 

जयशंकर यांनी केलेल्या विधानाचं कौतुक करत चीनचे सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सचे पत्रकार हू शिजिन यांनी एक ट्विट केलं आहे. "भारत हा एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी असलेला देश आहे, ज्याने जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी दारे उघडली आहेत. भारताचा व्यापक आंतरराष्ट्रीय प्रभाव अमेरिका वगळता इतर अनेक पाश्चात्य देशांना मागे टाकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते", असं ट्विट हू शिजिन यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाले. यानंतर रशियावर एक एक करून अनेक निर्बंध लादले जाऊ लागले. मात्र भारताने तटस्थ धोरण अवलंबून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियात युनायटेड नेशन्सपासून ते एससीओपर्यंत भारताने उघडपणे युद्ध आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे. रशियासोबतच्या व्यापारी संबंधांमुळे पाश्चात्य देश भारतावर नाराज आहेत. दरम्यान, जयशंकर दोन दिवसांच्या दौऱ्यावर मंगळवारी मॉस्कोला पोहोचले. भारत-रशिया संबंधांवर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय मजबूत आणि वेळोवेळी अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहणारे असे संबंध आहेत. कोरोना व्हायरस, आर्थिक दबाव आणि व्यावसायिक अडचणींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता यावर आपण युक्रेन युद्धाचा परिणाम देखील पाहत आहोत. 

संवादातून जागतिक आणि प्रादेशिक समस्या सोडवू"दहशतवाद आणि हवामान बदल या बारमाही समस्या आहेत. दोन्हीचा विकासावर वाईट परिणाम होतो. आमची चर्चा एकूण जागतिक परिस्थिती तसेच काही प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल", असं जयशंकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये, चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने जयशंकर यांच्या विधानाचा हवाला देत म्हटलं होतं की अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आम्ही भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आदर करतो आणि धोरणात्मक संयम पाहून आनंद होतो. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया