शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 4:03 PM

Bangladesh Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.

Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.  शेख हसीना लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. आरक्षणावरून महिनाभर सुरू असलेल्या गदारोळानंतर अशी वेळ आली की हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेशात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलक पंतप्रधान कार्यालयात घुसले. देशातील परिस्थिती पाहून लष्करानेच हसीनाचा राजीनामा मागितला होता. लष्करप्रमुखांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर हसीना यांनी देशातून पलायन केलं.

बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून आरक्षणाविरोधात हिंसक आंदोलन सुरू होते. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंदोलकांशी कठोरपणे वागण्यास सुरुवात केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. त्यानंतर रविवारी झालेल्या हिंसाचारात ९८ लोकांचा बळी गेला. त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी हसीना यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यामुळे शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. मात्र शेख हसीना इथपर्यंत कशा पोहोचल्या आणि त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाऊन घेऊया...

२८ सप्टेंबर १९४७ रोजी जन्मलेल्या शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. हसीना यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथे गेले. तिथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. यानंतर त्या काही काळ सेगुन बगीचा येथे राहत होत्या. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी ढाका येथे स्थलांतरित झाले.

राजकारणात कशा आल्या?

शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हता. १९६६ मध्ये जेव्हा त्या ईडन महिला महाविद्यालयात शिकत होत्या, तेव्हा त्यांना राजकारणाविषयी उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. यानंतर त्यांनी वडील मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीग या विद्यार्थी संघटनेचे काम हाती त्यांनी हाती घेतले. त्यानंतर बराच ाळ शेख हसीना ढाका विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातही सक्रिय होत्या.

आई वडिलांची हत्या

१९७५ मध्ये बांगलादेशच्या सैन्याने बंड करून हसीना यांच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारले. सशस्त्र सैनिकांनी शेख हसीना यांची आई, तिचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्यावेळी शेख हसीना या पती वाजिद मियाँ आणि लहान बहिणीसोबत युरोपमध्ये होत्या. आई-वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या. त्यानंतर इंदिरा गांधी सरकारने त्यांना भारतात आश्रय दिला. बहिणीसोबत त्या दिल्लीला आल्या आणि जवळपास सहा वर्षे इथेच होत्या.

वडिलांचा पक्ष पुढे नेण्याचा निर्णय

१९८१ मध्ये त्या बांगलादेशला परतल्या. हसीना या विमानतळावर पोहोचल्या तेव्हा लाखो लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर १९८६ मध्ये पहिल्यांदाच त्यानी सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. १९९१ मध्ये बांगलादेशात प्रथमच मुक्त निवडणुका झाल्या. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगला या निवडणुकीतही बहुमत मिळाले नाही. त्यानंतर १९९६ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि सत्तेवर आल्यानंतर शेख हसीना पंतप्रधान झाल्या. २००१ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर, २००९ मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या आणि तेव्हापासून त्या पंतप्रधान होत्या. 

दरम्यान, शेख हसीना यांनी दोनदा मृत्यूला चकवा दिला आहे. १९७ मध्ये जेव्हा त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली तेव्हा त्या देशाबाहेर असल्यामुळे योगायोगाने बचावल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला झाला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश