शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळली, भारतीयांना आणण्यासाठी मजार-ए-शरीफला जाणार विशेष विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:39 IST

Taliban situation in Afghanistan: भारत सरकारने यूपूर्वीच कांधारमधून आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे, आता मझार-ए-शरीफमधूनही सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्लीः अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर परिस्थिती प्रचंड बिघडली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या 70-80 टक्के भागांवर ताबा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कांधारमधील भारतीय दूतावास बंद करुन आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले होते. कांधारनंतर आता मजार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आपल्या सर्व राजदूत, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्यासठी एका विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. हे विमान बुधवारी सर्व भारतीयांना घेऊन परतेल.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यामुळे तालिबानचे हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली असल्यामुळे भारताने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना कांधारमधून आधीच बाहेर काढले होते. आता मजार-ए-शरीफमधूनही सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी आज संध्याकाळी मजार-ए-शरीफ ते दिल्लीसाठी एक विशेष विमान उड्डाण करणार आहे. मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली.

मजार-ए-शरीफमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विट केले, "एक विशेष विमान मझार-ए-शरीफ येथून नवी दिल्लीकडे रवाना होईल. मजार-ए-शरीफ आणि आसपासच्या परिसरातील कोणत्याही भारतीय नागरिकाला विनंती केली जाते की तो उशिरा सुटणाऱ्या विशेष विमानाने भारतासाठी रवाना होण्यासाठी तयार रहा."

वाणिज्य दूतावासाच्या दुसर्‍या एका ट्विटमध्ये सांगण्यात आले की, भारतात येणाऱ्या विशेष विमानात येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांचे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक, व्हॉट्सअॅपद्वारे खालील क्रमांकावर द्यावी: 0785891303, 0785891301 "

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला