शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Sri Lanka Crisis: एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:28 PM

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे.

नवी दिल्ली- आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की, त्यांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. 

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे. आज निर्माण झालेली खराब आर्थिक स्थितीला जबाबदार श्रीलंका स्वत: आहे. भारतापासून अंतर ठेवत चीनवर अधिक अवलंबून राहणे त्यांना महागात पडलंय. श्रीलंकेने आयएमएफपेक्षा चीनकडून जास्त कर्ज घेतले. त्यामुळे श्रीलंकेवर आजची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीलंकेबद्दल आपल्याला सहानुभूती असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने म्हटले आहे की, श्रीलंकेतील विविध वांशिक गट आणि विविध क्षेत्रांतील लोकांना चीन विविध माध्यमांचा वापर करून आपत्कालीन गरजा पुरवत आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत श्रीलंकेला मदत करत राहील, असे चीनने म्हटले आहे.

दरम्यान, आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, आता पुढे काय होईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारताने इंधनाबाबत मदत केली-

भारताने याआधी श्रीलंकेला डिझेल-पेट्रोल (इंधन)संकटावर मात करण्यासाठी मोठी मदत केली आहे. श्रीलंकेत तेलाच्या तुटवड्यामुळे तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तेल फक्त अत्यावश्यक कारणांसाठी वापरण्याची परवानगी होती. तेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम पदार्थांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पाठवून मदत केली आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय