शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

तैवानमध्ये आता पाण्याचे होणार रेशनिंग

By admin | Published: April 09, 2015 12:37 AM

भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे

तैपेई : भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. तब्बल १० लाख कुटुंबांची तहान भागविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. दर आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. तैवानच्या उत्तरेकडील अनेक शहरांत आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जलाशयातील साठ्याने तळ गाठला आहे. तैवानमध्ये यंदा जलसाठ्याने तळ गाठला आहे. देशात यंदा १९४७ नंतरचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे, असे तैवानच्या अर्थ व्यवहार मंत्रालयाने सांगितले. नागरिकांनी अशा बिकट वेळी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. राजधानी तैपेई वगळता उत्तरेकडील जवळपास सर्वच शहरांत भीषण पाणीटंचाई आहे. उत्तरेकडील शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या शिहमेन जलाशयातील साठा एकूण क्षमतेच्या २४.५६ टक्क्यांवर आला आहे. १९६४ नंतर प्रथमच या जलाशयाने ही पातळी गाठली आहे. प्रशासनाने नागरिकांना स्वयंपाक, अंघोळ आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीटंचाईचा औद्योगिक व रासायनिक कंपन्यांनाही फटका बसला आहे. सुमारे १,४०० कंपन्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून औद्योगिक पाणी वापरासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)