शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

आधी २६/११, पठाणकाेट हल्लेखोरांवर कारवाई करा; ­नवे पंतप्रधान शरीफ यांना भारत-अमेरिकेने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 6:22 AM

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे.

वाॅशिंग्टन :

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे. पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी. भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या काेणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर व्हायला नकाे, तसेच २६/११ आणि पठाणकाेट हल्ल्यातील दाेषींना न्यायालयाच्या कक्षेत आणावे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, त्यांनी दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने काम करावे, एवढेच मला त्यांना सांगायचे आहे. दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणात भारताला पाकिस्तानसाेबत सामान्य संबंध हवे आहेत. तसे वातावरण निर्माण करायची जबाबदारी पाकिस्तानची आहे. अमेरिकेसाेबतच्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारत आणि अमेरिकेत शिक्षणासह व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, डिजिटल, हवामानबदल, ऊर्जा तसेच संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आमंत्रण दिले आहे. त्यातून मेक इन इंडिया माेहिमेला प्राेत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.

चीनने हल्ला केल्यास अशी राहिल अमेरिकेची भूमिका- रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताने रशियाबाबत मवाळ भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली हाेती. चीनने हल्ला केल्यास रशिया मदतीला धावून येणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेकडून करण्यात आले हाेते. मात्र, अशा स्थितीत भारताच्या सार्वभाैमत्त्वाच्या रक्षणासाठी अमेरिका उभी राहील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लाॅयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. -  भारत आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील शेजारी राष्ट्रांच्या सार्वभाैमत्वाला चीन आव्हान देत आहे. चीन सीमेवर बांधकामे करतोय. मात्र, आम्ही तुमच्यासाेबत राहू. कारण तुम्ही तुमच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करीत आहात, असे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. तर चीनच्या विस्तारवादाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारतात द्विपक्षीय सहकार्य खूप महत्त्वाचे आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारताच्या सदस्यत्वासाठी अमेरिकेचे समर्थनसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी सदस्यत्व आणि आण्विक पुरवठादार गटात भारताचा समावेश करण्यास अमेरिकेचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या गटात भारताच्या समावेशाला चीनने विराेध केला आहे. भारताने अण्वस्त्र प्रसार राेखण्याच्या करारावर हस्ताक्षर न केल्यामुळे चीनचा विराेध आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान