शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

युद्धामुळे आलेले संकट मान्य नाही; भारताची संयुक्त राष्ट्रात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 05:29 IST

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे

संयुक्त राष्ट्रे : ‘रमजान महिन्यासाठी गाझामध्ये तत्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव सकारात्मक पाऊल आहे. सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे उद्भवलेले मानवतावादी संकट अस्वीकारार्ह आहे,’ अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्र आमसभेत ठामपणे मांडली.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे. भारताने या संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध केला आहे आणि कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांची जीवितहानी टाळणे अत्यावश्यक आहे. युद्धामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत, असेही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.

आण्विक प्रकल्पांवर हल्ल्याची धमकीइस्रायल आणि इराणमधील तणावही वाढत आहे. गेल्या आठवड्यात दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि इराणी अधिकाऱ्यांकडून बदला घेण्याच्या धमक्यांनंतर इराणमधील आण्विक प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. इराण आगामी काळात आपल्या वतीने हल्ले करण्यास या प्रदेशातील विविध यंत्रणांना उद्युक्त करील असे सांगण्यात येते.

शपथ घेणे महागात पडेल : अमेरिकानेतन्याहू यांनी रफाह या शहरावर आक्रमण करण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र रफाहवरील आक्रमण ही घोडचूक ठरेल आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस योजना आखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतwarयुद्धIsraelइस्रायल