शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?

By admin | Published: February 06, 2015 2:25 AM

तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत.

तैपेई : तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना कशी घडली, याबाबत तैवानचे नागरी उड्डयन प्रशासन आणि ट्रान्सएशिया एअरवेजने काहीही ठोस सांगण्यास नकार दिला असला तरी वैमानिकाने विमान ९० अंशांनी कलंडण्याआधी विमान संकटात असल्याचा संदेश दिला होता (मे डे) असे नागरी उड्डयन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले; परंतु त्यांनी दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत बोलणे टाळले.ट्रान्स एशियाचे विमान (जीई-२३५-एटीआर ७२-६००) उड्डाणानंतर १० मिनिटांनी हवेत हेलकावे घेत पुलावर धडकत नदीत (किलंग) कोसळले. या विमानात चालक पथक आणि ५८ प्रवासी होते. बेपत्ता सर्व प्रवासी चिनी पर्यटक आहेत. हे विमान किनमेनकडे जात होते. (वृत्तसंस्था)पुलावर धडकण्याआधी या विमानाचा एक पंखा पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडकला होता. हे विमान कोसळत असताना पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवरील डॅशबोर्ड कॅमेऱ्याने हा अंतिम क्षण टिपला आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले. तथापि, नदीतील दलदलीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे पाणबुडे नदीच्या तळाशी जाऊन मृतदेह शोधत आहेत.३१ चिनी प्रवाशांचे नातेवाईक विशेष विमानाने तैवानला पोहोचत आहेत. १५ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश असून यात एका बालकाचाही समावेश आहे. एटीआर-७२-६०० हे विमान दर्जेदार कंपनीचे असून वैमानिकालाही ४,९०० तास उड्डाणाचा अनुभव होता, असे नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले.आवाज ऐकल्यानंतर आसने बदलली...हे विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तैवानी दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बाळासह डाव्या बाजूकडील आसन बदलत उजव्या बाजूकडील आसनावर स्थानापन्न झाल्याने ते बचावले, असे वृत्त युनायटेड डेलीने दिले आहे. विमानाच्या पंख्यातून येणाऱ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही जागा बदलली, असे लिन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नंतर विमान कलंडत नदीत कोसळले. लिनने जागा सोडत आपल्या पत्नीला ओढून वर काढले. आपले बाळ पाण्यात पडल्याचे लिनला दिसले. पाण्यात बुडाल्याने बाळाचा चेहरा आणि ओठ काळे-निळे पडले होते. प्रसंगावधान राखून बाळाच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर तंत्र) बाळाच्या हृदयाची गती सुरू करण्यात लिन यशस्वी ठरला.हवाई प्रवास धोकादायक होत आहे का?.....गेल्या वर्षी एअर मलेशियाचे विमान भर आकाशातून गायब होणे आणि त्यानंतर एअर एशिया विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे हवाई प्रवास धोकादायक तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमान दुर्घटनेच्या दृष्टीने मागचे वर्ष अत्यंत दु:खदायी ठरले.गेल्या वर्षी २१ विमान दुर्घटना घडल्या. विमान दुर्घटनांची ही संख्या कमी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत पाच टक्के विमानांची उड्डाणे होत होती; परंतु दुर्घटनेचे प्रमाण चौपट होते. एअरलाईन रेटिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगभर विमानसेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांनी २ कोटी ७० लाख उड्डाणे केली. यातून ३.३ अब्ज प्रवाशांनी हवाई सफर केली. (वृत्तसंस्था)