शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 3:31 AM

Turkey Rejects India Wheat Consignment : तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

स्वतःला पाकिस्तानचा आयर्न ब्रदर म्हणवून घेणारा तुर्कस्तान (Turkey) सध्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे. यामुळे भारताने त्याला मदत म्हणून गव्हाची खेप पाठवली होती. मात्र त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, असे करण्यामागचे कारण सांगताना तुर्कस्तान सरकारने, असा काही युक्तिवाद केला आहे, की ज्यावर सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भारताने पाठवलेल्या गव्हात सापडला रुबेला व्हायरस - यासंदर्भात बोलताना तुर्की सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे, "भारताने पाठवलेल्या गव्हात रुबेला व्हायरस आढळून आला आहे. यामुळे त्यांनी पाठवलेली 56 हजार 877 मेट्रिक टन गव्हाची खेप नाकारण्यात आली आहे." तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

तुर्कीच्या विनंतीवरून पाठवण्यात आला होता 56 हजार मेट्रिक टन गहू-जगभरातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने, भारतातही गहू आणि तांदळाच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, मित्र देशांना त्यांची गरज आणि परस्पर संबंध लक्षात घेत गव्हाची विक्री केली जात आहे.

तुर्कस्तान आणि भारताचे संबंध चांगले नाहीत. पण त्यांनी गहू पाठवण्याची विनंती केल्यानंतर, भारत सरकारच्या सूचनेनुसार तेथे गहू पाठविण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या प्रेमात बुडालेल्या तुर्कस्तानने भारताची ही मदत नाकारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जवळपास 12 देशांनी भारताकडे मदत मागितली आहे.

टॅग्स :IndiaभारतGujaratगुजरातCentral Governmentकेंद्र सरकार