शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

दुबईतील बेकरीमध्ये घुसून ३ भारतीयांवर पाकिस्तानी व्यक्तीने केला तलवारीने हल्ला; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:01 IST

दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या तेलंगणातील तीन भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या तेलंगणातील तीन भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. ११ एप्रिल रोजी दुबईतील एका बेकरीमध्ये  ही घटना घडली जिथे हे तीन जण काम करत होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, हा हल्ला एका पाकिस्तानी व्यक्तीने केला, जो धार्मिक घोषणा देत बेकरीमध्ये घुसला आणि त्याने तलवारीने हल्ला केला.

निर्मल जिल्ह्यातील सौन गावातील रहिवासी ३५ वर्षीय अष्टपू प्रेमसागर याचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचे काका ए. पोशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसागर गेल्या ५-६ वर्षांपासून दुबईतील एका बेकरीमध्ये काम करत होता. दोन वर्षांपूर्वी भारतात आला होता. काम करत असताना आरोपीने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, प्रेमसागर त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहतो. कुटुंबाने सरकारकडे मृतदेह भारतात आणण्याची आणि कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. निजामाबाद जिल्ह्यातील श्रीनिवास याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. 

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या माहितीला दुजोरा दिला. या घटनेत जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव सागर असं आहे, ज्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सागरची पत्नी भवानी हिने निजामाबादमध्ये बोलताना सरकारला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

संपूर्ण तेलंगणामध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं रेड्डी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDubaiदुबईTelanganaतेलंगणाIndiaभारतPakistanपाकिस्तान