शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

"5 दिवसात दोन हजार कॉल", मिशन काबूल यशस्वी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 3:17 PM

Afghanistan Crisis: अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसांत दोन हजारांहून अधिक कॉल मदतीसाठी आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली:तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी भारतीय किंवा इतर परदेशी नागरिक कसे धडपडत आहेत याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की परराष्ट्र मंत्रालयानं स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसात दोन हजारांहून अधिक कॉल आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की 1200 हून अधिक मेलला उत्तर देऊन अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण स्पेशल सेलला गेल्या पाच दिवसांत 2000 हून अधिक फोन आले आहेत. हा सेल अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय आणि इतर गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्हिसा, पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व आवश्यकतांची माहितीही दिली जात आहे. 

मदतीसाठी येत असलेले कॉल फक्त काबूलमधूनच नाही तर अफगाणिस्तानच्या विविध भागातून येत आहेत. यात फक्त भारतीयच नाहीत, तर अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वाटत नसलेल्या अफगाणांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रविवारी 250 पेक्षा जास्त प्रवासी ताजिकिस्तान आणि कतारची राजधानी दोहामार्गे काबूलहून भारतात पोहोचले. तर 168 प्रवासी विशेष हवाई दलाच्या विमानांद्वारे गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहेत. यापैकी 107 भारतीय नागरिक आहेत. तर 24 अफगाण नागरिक आहेत. त्यात दोन अफगाणिस्तानचे संसद सदस्य नरेंद्र सिंह खालसा आणि अनारकली आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान