शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अमेरिका-इराण तणाव; भारत तेलाच्या टँकरवर नौदलाचे अधिकारी तैनात करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 15:52 IST

ओमानच्या आखातात अमेरिकेने सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : ओमानच्या खाडीमध्ये तेलाच्या टँकरवर दोनवेळा हल्ला झाल्याने अमेरिका आणि इराणमध्ये ताणावाचे वातावरण आहे. यातच दोन दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडल्याने ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, काही क्षणांपूर्वी मागे घेतले होते. या सर्व तणावाचा आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर परिणाम दिसू लागला असून तेलाच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे भारताने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

ओमानच्या आखातात अमेरिकेने सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून केव्हाही दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. यामुळे भारताने सावध पाऊल म्हणून देशाच्या तेल टँकरांवर नौदलाचे अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्शियन आखातातून जाणाऱ्या भारतीय टँकरवर नौदल अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. 

या टँकरवर एक अधिकारी आणि दोन सशस्त्र नौसैनिक असण्याची शक्यता आहे. नौसेनेची ही टीम हेलिकॉप्टरद्वारे टँकरांपर्यत पोहोचविली जाणार आहे किंवा बोटीद्वारेही टीमला टँकरपर्यंत नेले जाऊ शकते. या टीमवर टँकरना हर्मुज खाडीतून सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी असणार आहे. 

दर दिवशी भारताचे 5 ते 8 टँकर या खाडीतून ये-जा करतात. यामध्ये कच्च्या तेलाचा मोठा साठा असतो. भारताचे 63 टक्के कच्चे तेल खाडीच्या मार्गाने आणले जाते. अराक, सौदी अरब, इरान, युएई आणि कुवेत या देशांकडून हे तेल आणले जाते. 

 

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे मानवरहित टेहळणी विमान ईराणने पाडले होते. यानंतर संतप्त झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी ईराणवर हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, काही मिनिटे आधी त्यांनी हा आदेश मागे घेतला. याचवेळी प्रसारमाध्यमांमध्ये ईराणच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ट्रम्पनी ठेवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, ट्रम्प यांनी ट्वीट करत त्यांनी हल्ल्याचा आदेश मागे घेण्यामागचे कारण सांगितले आहे. 

ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, ईराणच्या या कृत्याने हल्ला करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर शस्त्रास्त्रेही बसविण्यात आली होती. मात्र, मोठ्या संख्येने निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणार असल्याने शेवटच्या मिनिटाला आदेश मागे घेण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करण्यात येणार होता. मात्र, जेव्हा वरिष्ठ आधिकाऱ्यांना विचारले की, किती लोकांचा मृत्यू होईल तेव्हा त्यांनी सर, 150 असे उत्तर दिले. यामुळे हल्ला थांबविला, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIndiaभारत