शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शांत बसण्यासाठी आम्ही अणुबॉम्ब बनविला नाही, पाकिस्तानी मंत्र्यांची भारताला अणुयुद्धाची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:08 IST

आधी दिली धमकी नंतर...

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेत दहशतवादावरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानची जोरदार धुलाई केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांचा तिळपापड झाला आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर दुसऱ्या मंत्री शाजिया मर्री यांनी ‘आम्ही अणुबॉम्ब शांत बसण्यासाठी बनविला नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी त्यांनी बिलावल यांच्या वक्तव्याची पाठराखण केली खरी पण ‘पाक हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सांगून एक पाऊल मागेही घेतले.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकने भारतापेक्षा कितीतरी जास्त बलिदान दिले आहे, असे आश्चर्यकारक ट्टीट शाजिया यांनी केले आहे. ‘भारतीय प्रसार माध्यमांतील काही घटक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय मंत्र्यांच्या चिथावणीखोर टिप्पण्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने भारतापेक्षा कितीतरी अधिक बलिदान दिले आहे. मोदी सरकार अतिरेकी आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या. 

गरज पडल्यास मागे हटणार नाही...‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये, आमची आण्विक स्थिती गप्प बसण्यासाठी नाही. गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही.शाजिया मर्री

ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि झकीउर रहमान लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश पाकिस्तान आहे, असे भारताने म्हटले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर