शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
2
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
3
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
4
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
5
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
6
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
7
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
8
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
9
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
10
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
11
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
12
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
13
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
14
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
15
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?
16
Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड
17
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
18
अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय
19
"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था
20
Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:55 AM

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.

नवी दिल्ली - आर्मेनियाच्या मुद्द्यावरून भारताचे अझरबैजानसोबतचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. अझरबैजानचे भारतातील माजी राजदूत अश्रफ शिकालीव यांनी काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. अझरबैजानने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी सहकार्याची भूमिका कायम ठेवली आहे असं राजदूताने एका मुलाखतीत म्हटले आहे. 

गेल्या ३० वर्षांत अझरबैजानची काश्मीरबाबतची भूमिका बदललेली नाही, ती अजिबात बदललेली नाही असं अझरबैजानचे राजदूत म्हणाले, जे नोव्हेंबरपर्यंत भारतात अझरबैजानचे राजदूत म्हणून काम करत होते. भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा आदर करून हा प्रश्न शांततेने सोडवावा. ही आमची भूमिका आहे. गेल्या तीन दशकात यात कोणताही बदल झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, २१ जानेवारी २०२० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या भेटीदरम्यान अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव म्हणाले की अझरबैजान जम्मू आणि काश्मीर मुद्द्यांवर पाकिस्तानला नेहमी पाठिंबा देईल.

आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये अनेक दशकांपासून युद्ध 

अर्मेनिया आणि अझरबैजान अनेक दशकांपासून नागोर्नो-काराबाखवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहेत. २०२० मध्ये या प्रदेशावरील शत्रुत्वाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही देशांचे सैन्य रणांगणात उतरले. अझरबैजानने आर्मेनियावर लढाई जिंकली आणि २०२३ मध्ये नागोर्नो-काराबाख पूर्णपणे ताब्यात घेतला.

अर्मेनियाने भारतासोबत केलेल्या शस्त्राच्या डीलवर भडकले अझरबैजानचे राष्ट्रपती

काही महिन्यांपूर्वी आर्मेनियाने भारत आणि फ्रान्ससोबत शस्त्रास्त्रांचा मोठा करार केला होता. या करारात हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे खरेदीचा समावेश आहे. अझरबैजानचे राष्ट्रापती इल्हाम अलीयेव या करारावर संतापले होते. आगीत पेट्रोल टाकण्याचं काम भारत आणि फ्रान्स एकत्र काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते म्हणाले होते, भारत आणि फ्रान्ससारखे देश आर्मेनियाला शस्त्रे पुरवून आग आणखी भडकतवत आहेत. हे देश अर्मेनियामध्ये असा भ्रम निर्माण करत आहेत की या शस्त्रांच्या मदतीने ते काराबाख परत घेऊ शकतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर