शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

पाकिस्तानात चहा पिण्यापासून लोकांना का रोखलं जातंय?; सरकारचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:56 PM

मागील सरकारने अर्थव्यवस्था डबघाईला आणली असा आरोप मंत्री इकबाल यांनी केला. माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्ताननं आता त्यांच्या जनतेला चहाचा वापर कमी करण्याचं आवाहन केले आहे. लोकांनी जास्त चहा पिऊ नये असं पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांनी म्हटलं आहे. चहासाठी लागणारं साहित्य पाकिस्तानात आयात करावं लागतं. त्यामुळे जर जनतेने हे पाऊल उचललं तर आयातीवरील खर्च कमी होण्यास मदत मिळेल असं तेथील सरकारला वाटतं. 

पाकिस्तान सरकार कर्ज घेऊन चहासाठी लागणारं साहित्य आयात करते. त्यामुळे आयातीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या मंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे. मंत्र्यांनी व्यापारी आणि देशातील जनतेला आवाहन केले आहे की, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. देशात वीजेचे संकट असल्याने बाजारात रात्री ८.३० नंतर वीज बंद केली जाते. एका पाकिस्तानी वृत्तपत्राशी मंत्री अहसान इकबाल यांनी हे विधान केले. 

मंत्री अहसान इकबाल म्हणाले की, देशातील जनतेने रोजच्या दिनक्रमातून १-२ कप चहा कमी पिण्याचं आवाहन करतो. कारण चहासाठी लागणारं साहित्य आयात करावं लागतं आणि त्यासाठीही कर्जाने पैसे घ्यावे लागतात. पाकिस्तानी सरकारने मागील महिन्यात आयात खर्च कमी करण्यासाठी ४१ वस्तूंवर २ महिन्यांसाठी बंदी आणली आहे. परंतु त्याने जास्त फायदा होताना दिसत नाही. या निर्णयामुळे आयातीवरील खर्चात ६० कोटी डॉलर घट झाली परंतु हे एकूण आयात खर्चाच्या केवळ ५ टक्के इतकेच आहे. 

पाकिस्तानी सरकारने कार, मोबाईल, सौंदर्य प्रसाधन, सिगारेट, खाद्य उत्पादने, काही कपडे, साहित्य आयात करण्यावर बंदी घातली आहे. मागील सरकारने अर्थव्यवस्था डबघाईला आणली असा आरोप मंत्री इकबाल यांनी केला. माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर फसलं. परंतु देश वाचवण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत. पुढील काही महिन्यात अर्थव्यवस्था रुळावर येईल असा विश्वास आहे. कृषी क्षेत्रावर विशेष भर दिला जात आहे. गहू, साखर, कापूस उत्पादनाला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना पामतेल वाढवण्यास सांगितले आहे जेणेकरून देशात या उत्पादनाची निर्यात करून परदेशी चलन मिळू शकेल असं मंत्री अहसान इकबाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान