शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

'नोबेल' विजेत्या मलाला हिला वाटतेय काश्मीरमधील महिलांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 12:17 PM

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मुलींच्या शिक्षणासाठी आपलं सबंध आयुष्य अर्पण करणाऱ्या नोबल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाई हिने काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भीती व्यक्त केली. काश्मीर कलम ३७० अंतर्गत देण्यात आलेला विशेष दर्जा भारत सरकारने हटविला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणापूर्ण शांतता आहे. यावर मलाला हिने काश्मीरमधील लहान मुलांची आणि महिलांची काळजी वाटत म्हटले आहे. या संदर्भात मलालाने ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे.

मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, माझे आई-वडिल लहान होते तेव्हापासून काश्मीरमधील लोक संघर्षमय जीवन जगत आहेत. दक्षिण आशियाला मी माझं घर समजते, त्यामुळे काश्मीरविषयी मला विशेष काळजी वाटते. एकमेकांना अडचणीत टाकण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत काश्मीरमधील लहान मुलं आणि महिलांची काळजी वाटत आहे. काश्मीरमधील स्थिती अत्यंत तणापूर्ण असून संघर्ष झाल्यास अनेकांचे नुकसान होऊ शकते, असंही मलालाने नमूद केले.