शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जालन्यात तीन दिवसांत ७.९ मिलिमीटर पाऊस; वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू

By दिपक ढोले  | Published: April 28, 2023 6:14 PM

पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. त्यातच २५ ते २७ एप्रिलदरम्यान पावसाचा जोर वाढला असून, जवळपास ७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, २ हजार १६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या उन्हाळा सुरू आहे. असे असतानाही अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ७.९ मिलीमीटर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस हा जालना तालुक्यात झाला आहे. जालना तालुक्यात १४.३० मिलीमीटर, घनसावंगीत ९.१० तर अंबड तालुक्यात ७.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, ३ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात ४५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, १ हजार ६९३ हेक्टरवरील बागायती पिकांचे तर २७७ हेक्टवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसagricultureशेती