शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:12 IST

५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द झालेल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी तब्बल ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. तर यादीतील आधार क्रमांक चुकल्याबाबत ६७४ शेतक-यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या पहिल्या यादीत टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील ११०२ शेतक-यांची नावे होती. तर दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांची नावे समाविष्ठ करण्यात आली होती. याद्या जाहीर झाल्यापासून आजवर ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ६७५ शेतक-यांनी आधार क्रमांकाबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. पैकी राष्ट्रीयीकृत बँकेतील ५४३ शतक-यांचे ४ कोटी ९१ लाख रूपये कर्जखात्यात जमा झाले आहेत.शासनाच्या दोन्ही याद्यांमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या ८१ हजार ८१६ शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण होणे अद्याप बाकी आहे. या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. तर शेतक-यांकडून दाखल होणा-या तक्रारींचे तात्काळ निरसण करण्याची प्रक्रियाही केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांची यादी येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्ज