शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 3:39 PM

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.'

दिलीप सारडा बदनापूर - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल बदलून दाखवावेत, असे जाहीर आव्हान माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे आज(दि. 8) आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देत असून आगामी अधिवेशनात राज्यपाल म्हणून तिथे भाषण करायला येतील ते नवीन राज्यपाल आणून दाखवा.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल स्वतः म्हणतात की मला इथे राहण्याची इच्छा नाही. आता मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगावे आणि राज्याताल नवीन राज्यपाल मिळवून द्यावेत. आज राज्यामध्ये शेतकरी खुश नाही, महिला खुश नाही. सध्याचे राज्यात घटनाबाह्य सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. आज कोर्टात केस चालू आहे, ज्या मिनिटाला संविधानात्मक निकाल येईल, त्यावेळी हे सरकार पडेल. सत्ता कोणाची असो परंतु सत्यासमोर सत्ता जायला वेळ लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दोन सरकारमध्ये फरक हाच असतो. आमचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रथम द्यायची, असा निर्धार केला होता व त्याप्रमाणे दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आताच्या सरकारने प्रचंड अटी शर्ती लावून शेतकऱ्यांना मदत दिली. आम्ही आमचे कर्तव्य म्हणून हे काम केले. याचा गाजावाजा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी होल्डिंग लावले नाही , असंही आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रात नवीन उद्योग येईना, रोजगार मिळेना. ज्या उद्योगाला आम्ही राज्यात आणण्यासाठी मंजुरी दिली होती तो उद्योग गुजरातमध्ये गेला. ते म्हणतात की, स्वित्झर्लंडमधील डावोसमध्ये जाऊन 80 हजार कोटीची परदेशी गुंतवणूक आणली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आम्ही बोलून नव्हे तर करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला हे मुख्यमंत्री अठ्ठावीस तासांसाठी डावोसला जाऊन चाळीस कोटी खर्च करुन येतात, असा घणाघातही आदित्य यांनी केला. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJalanaजालना