शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाच महिन्यांनंतरही ६० गावांमध्ये समित्या नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:01 IST

अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : पाच महिन्यांपूर्वी बदनापूर पोलीस ठाण्याअतंर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात दारूबंदी समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांंनी दिले होते. पाच महिन्यानंतरही पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया ७६ गावांपैकी १६ गावांमध्येच दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या. अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे.गणेशोत्सव काळात बदनापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये अनेक गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित करून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी पोलीस पाटील व शांतता समितीच्या सदस्यांना आपल्या कर्तव्याची जाणिव करून देत गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी गावपातळीवर येत्या आठ दिवसात दारूबंदी समिती स्थापना करावी, अशा सूचना दिल्या होत्या.समिती स्थापन करण्यासाठी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्ती, ग्रापचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांचा समावेश करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर काही गावांमध्ये समित्या स्थापन झाल्या. परंतु, काही गावांमध्ये अद्यापही समित्या स्थापन नसल्याने अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे़गावात सहज उपलब्ध होणाºया दारूमुळे अनेक तरूणांना दारूचे व्यसन लागले असून या दारूमुळे अनेकांची भांडणे होत आहे. अनेकांना दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचीही पर्वा करत नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत़ लवकरच समित्या स्थापन करू, असे पोलीस निरीक्षक एम. बी. खडेकर यांनी सांगितले.पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्ततालुक्यात बदनापूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ७६ गावांपैकी केवळ २२ गावांमध्ये पोलीस पाटलांच्या जागा भरलेल्या आहे. ५४ गावे पोलीस पाटलाविनाच आहे.गावात सुरू असलेले अवैध धंदे, गावातील छोट्या- मोठ्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस पाटील महत्वाचा दुवा आहे़ परंतु, पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया अनेक गावांमध्ये पोलीस पाटील नाही. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीSocialसामाजिक